Monday 5 January 2015

अकेलापन





अकेलापन भी इतना 
प्यारा होता है 
यह अब समझा है मैने 
माना अपनोकेही दिलो को 
समझने में वक्त गुजराता रहा 
खुदके दिलमे झाकणे का मौका 
अकेले होने के बादही तो मिला है…। 


तुझ्या तुझ्यातच मी


तुझ्या तुझ्यातच मी 


कधी हसन कधी रडण 
कधी अधिक कधी उण 
तुझ्या संगे सखी माझे 
बहरले जीवन !!

तुझ्या तुझ्यातच मी 
माझ तुझ्यात हरवन 
तुला भेटुनिया मग 
माझ मलाच भेटन !!

तुला पाहुनिया मी 
होतो पावसाळी घन 
तुझ्या मिठीत माझे 
मग बरसुनी जाण !!

मोरपिसासारखे तुझे 
सप्तरंगी विभ्रम 
तुझी जादुई अदा 
मला पडतो संभ्रम !!

संगे तूझ्या माझे ना 
राहिले माझे मन 
तुझ्या तुझ्याच सोबतीचे 
मला हवे सारे क्षण !!


Tuesday 30 December 2014

एक तारा माझ्यासारखा..............

एक तारा माझ्यासारखा..............


आकाशातल्या अब्जावधि ताऱ्यांमध्ये   
एक तारा लुकलुकताना  मला नेहमी दिसतो. 
जणू त्याचा प्रकाश शोध घेत असतो 
कुणाच्या तरी सहवासाचा, सोबतीचा. 
अंधार गडद झाला की, 
त्याच्या आजुबाजुला बरेच तारे दिसायला लागतात. 
मग वाटत त्याचा हा प्रवास संपला.
पण नाही त्याच्या आजुबाजुला दिसणारे तारे 
हा केवळ एक भास असतो. 
तो आधी जसा होता तसाच एकटा असतो 
सहवासाच्या, सोबतीच्या कधीच न संपनाऱ्या शोधात... 
कधीच न संपनाऱ्या प्रवासात.... 
एक तारा माझ्यासारखा..............



Shubhaste Santu Panthanah!

माझे गाणे माझे खाणे……… 

!!शुभास्ते सन्तु पन्थान!!

वेगवेगळ्या विचारांचे चक्र प्रत्येकाच्या मनात फिरत असतं. आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर येणारे अनुभव कधी सुखावणारे असतात तर कधी सतावणारे. नाही म्हंटल म्हणून विचारांचं हे चक्र थांबत नाही. त्याच रिमोट कंट्रोल आपल्या हातात कधी नसतोच मूळात. एक सतत वाहणारा प्रवाह असतात हे विचार.  काळ, वेळ, प्रसंग, व्यक्ती आणि नियती जणू मिळून ह्या विचारांची जडण घडण करत असतात. ह्या प्रवाहात मन सुद्धा वाहत असतं. 

माझ्या जीवन प्रवासात असेच अनुभव मलाही येतात. मग एक विचारांचं चक्र माझ्याही मनात सुरु होत. विचारांच्या  ह्या हिंदोळ्यावर बसून माझं  मन खूप उंच उंच झोके घेत आणि नवीन अनुभव सोबत घेऊन पुन्हा माझ्याजवळ येत…. तेव्हा मला काय वाटत ……… हे सांगण्याचा एक खराखुरा प्रयत्न. 

जसा प्रत्येक गाणारा कवी नसतो तसाच प्रत्येक लिहिणारा लेखक किवा कवी नसतो. मला लिहायला आवडतं. ह्या आधीच्या वाक्यात माझी लिहिण्याची भूमिका मी स्पष्ट केली आहे. त्यावर वेगळी चर्चा नको एवढी माफक अपेक्षा. जस लिहायला आवडत तसच खायला सुद्धा आवडतं. आणि म्हणून माझ्या ह्या ब्लॉगच बारसं  करायाच ठरवलं तेव्हा पटकन जे नाव सुचलं ते … "माझे गाणे माझे खाणे". 

ब्लॉग सुरु करावा ह्याची कल्पना आणि प्रोत्साहन देणारा माझा सगळ्यात जवळचा मित्र समितीन ब्रीद ह्याचा उल्लेख केल्याशिवाय श्रीगणेशा होणार नाही. नावासाठीही त्याचाच दुजोरा मिळाला. 

विचार करणं, मनाच गुंतन किवां  जीवन जगण … हे सगळ एक प्रवास नाहीतर आणखी काय आहे. एक अखंड प्रवास. थकलो तरीही न थांबणारा. माझा हा ब्लोग सुद्धा एक प्रवास असणार आहे तुमच्यासोबत करण्याचा. म्हणूनच तुम्हाला आणि मलासुद्धा ह्या प्रवासासाठी शुभास्ते सन्तु पन्थान……